तुला सांगितले का कोणी आल्या होत्या त्या दाराशी थेट शिरल्या मनात आणि डोळ्यांत बसल्या किस्से पुराने सांगुनी पोटभरुनी हासल्या घेऊन त्या आल्या संगे ती उन्हं नी पावसाळे जेव्हा उनाड होते वय आणि मन हे बेभान खूप बोलल्या माझ्याशी मज रडवूनी गेल्या तुझ्या स्पर्शाची तहान मनी जागवूनी गेल्या!!!
मोडकळीस आलेले मन आणि हा तुफान वारा उन्हं रखरखीत फार नाही राहिला निवारा गेल्या पावसाळ्यातच झिरपत होत्या भिंती सारवले सारे घर मनवन्या केल्या किती उभे राहिले खंबीर एका नव्या आवेगाने पण क्षणातच सारे स्तब्ध केले वादळाने!!!
👍☺
ReplyDeleteThanks
Delete👍☺
ReplyDeleteKhup chhan...
ReplyDelete