तिमिर धनु


         एकांत क्षणी  मनाच्या पटलावर गतकालीन घटनांचे येणे जाणे चालूच असते. आठवणींचे थवेच्या थवे गर्दी करू लागतात. त्यातीलच काही अगदी अखेरच्या श्वासांपर्यंत न पुसलं जाणार आपलं अस्तित्व वारंवार खुणावत असतात. मग मनाचा वारु सुसाट वार्याच्यागतीने पुढे सरकणार्या वेळेच्या विरूद्ध दिशेने धावू लागतो. उगीचच त्या हव्याश्या वाटणार्या घटना पुन्हा अनुभवण्यासाठी त्या गूढ आठवणींच्या धुसर वाटेवरून भरधाव वेगात नुसताच पळत राहतो. सारे लगाम त्या वाटेवरील धुळीत तूटुन पडतात.

         अशातच त्यांतल्याच काही अश्या ज्यांच अस्तित्व जाजतं. ते पुसता आल असत तर किती बरं झालं असतंअशी भावना उफाळून येते. त्यांचे रंग इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे सोज्वळ नसतात. अगदी प्रखर असतात. डोळ्यांत तीव्रतेने घुसणारे भडक रंग.....काळी छाटा असणारे....अशा धनुला काय म्हणावे बरे.... तिमिरधनु’…गेले काही दिवस अंधारलेल्या मनाच्या नभावर थबकले आहे.  

         त्यातल्या रंगांची शहानिशा करायला लागताच मन नानाप्रकारचे प्रश्न विचारायला सुरूवात करते. का वागली मी अशी त्यावेळी?’  मग मन स्वताचीच समजूत घालण्यास सज्ज होते. परिस्थितीच्या माथ्यावर दोष मढवू पाहाते. पण मनाच्या या डावांत अडकून पडणे निरर्थकच नाही का? त्या रंगाना जशेच्या तसे स्वीकारून त्यातून बाहेर पडणे कधीही चांगले. अन्यथा नको असणार्या आठवणींच अस्तित्व पुसट होण्यापेक्षा अधिकच ठाम होत जातं. म्हणूनच द्वेष,क्रोध,मत्सराचे हे रंग मुठीत बांधुन ठेवू नयेत तर उधळून लावावेत. Life becomes easier when you let go!!

नको थबकू तिमिरांच्या गावी
गाव तो फार ऊजाड
तिमिर धनुत न्हालेले
जन ते फार अनाड

का लेवावे काळ्या क्रोधा
नेई अंधारी जो घनदाट
माणसाला माणूस परका
भूलवून देई जो अनुराग

सोड विचारांची कमान
नकार ज्यांतून सांडे
न दिसे उद्याची प्रभात
नयनी झापड बांधे

ईर्षेचा तर रंगच न्यारा
अनोळखी भासे स्वकाया
अनुताप घेईल भरारी
न राहील उतराया पायरी

ओढून घे प्रीतीचा शेला
निश्चयाचा वारु बांध
कमान हाती आशेची असु दे
धमनीत क्षमेचे रक़्त महान

असतील गाठीला शिखरे यशांची
मायमातीत रूजून रहा
नात्यांच्या स्पर्शास जाग
राख मायेचा ओलावा!!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्मृती

रेतकण

वादळांत